१) गाजराचा रस हा डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतो. या रसाने आपली दृष्टी चांगली होते.
२) गाजराचा रस पिल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी गाजराचा रस जरूर प्यावा.
३) गाजरामध्ये ‘अ’ जीवनसत्व असते. ते गाजराच्या रसात भरपूर असते. त्यामुळे आपला सूर्यकिरणांपासून बचाव होतो.
४) गाजराचा रस पिल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यापासून आपला बचाव होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांनी गाजराचा रस नियमित घ्यावा.
५) आपल्या शरीराचा एखादा भाग भाजला किंवा जळाला असेल तर त्यावर गाजराचा रस लावा. त्यामुळे भाजलेली जागा थंड पडेल आणि तुम्हाला आराम मिळेल.
६) गाजराच्या रसातून आपल्याला जास्त प्रमाणात फायबर मिळते. ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
७) गाजराच्या रसात सी जीवनसत्व असते. त्यामुळे आपल्याला संधिवाताचा त्रास जाणवत नाही.