आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णत: विकसित झालेली नसल्याने जीवजंतू त्यांच्यावर लवकर आक्रमण करतात आणि ती आजारांनी त्रस्त होतात. तसेच मच्छर आणि इतर जीवजंतूंपासून मुलांची काळजी घेतली नाही तर ती नेहमी आजारी पडतात. यासाठी मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे. तसेच मुलांना उकळून गार केलेले पाणी नेहमी दिले पाहिजे. अजूनही पावसाळी वातावरण असल्याने मुलांना जास्त वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका. तसेच मुलांची वैयक्तिक स्वच्छताही राखली पाहिजे.
अशी घ्या काळजी
१) पाणी दुषित झालेले असल्यास डायरिया, टॉयफॉइडसारखे आजार लगेच बळावतात. यासाठी मुलांना उकळून गार केलेले पाणी द्यावे.
२) पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका. मुलांना इन्फेक्शन लवकर होते.
३) आजूबाजूचा परिसर तर स्वच्छ ठेवा. मुलांची वैयक्तिक स्वच्छताही ठेवा.
४) मच्छरांपासून मुलांना जपा. डासांपासून अनेक आजार पसरतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)