आरोग्यनामा ऑनलाईन- अर्भकाच्या डोळ्यात काजळ घालण्याची प्रथा खूप जुनी आहे. भारतीय संस्कृतीनुसार नजर लागू नये, यासाठी डोळ्यांत काजळ लावल जातं. भारतातील सर्व खेड्यांमध्ये, शहरे आणि महानगरांमध्ये ही प्रथा पाळली जाते. परंतु(Take care) ती योग्य की अयोग्य असा प्रश्न पडतो. डोळे हा शरीराचा सर्वात नाजूक(Take care) भाग आहे. त्यामुळे मुलाच्या डोळ्यात काजळ लावणे योग्य आहे का?
काजळ लावण्याचा प्रभाव
आजीच्या सल्ल्यानुसार काजळ हे रामबाण औषध आहे. जे बाळाला सर्व प्रकारच्या आजारांपासून आणि समस्यांपासून वाचवते.
काजळामुळे बालकाचे डोळे चमकदार आणि सुंदर दिसतात. परंतु डॉक्टरांच्या मते काजळ बाळासाठी हानिकारक आहे.
डॉक्टरांचे मत
काजळामुळे अर्भकाच्या डोळ्यांतून पाणी येण्याची तक्रार वाढू शकते. खाज सुटणे तसेच अलर्जी होऊ शकते. काजळ लावल्यानंतर डोळे व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर संसर्ग होण्याची शक्यता असते.
अनेकदा ते डोळ्यांच्या काठावर जमा होते. डोळ्यांमधील धूळ आणि घाण या गोष्टींवर त्वरीत परिणाम करते. यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.
काजळ असे लावा
जर डॉक्टरांच्या या गोष्टींशी सहमत असाल आणि तरीही मुलाचे डोळे काजळाने सजवायचे असतील तर सेंद्रिय काजळ वापरा. बाजारात उपलब्ध काजळाऐवजी घरात तयार केलेले काजळ वापरा किंवा चांगल्या कंपनीने बनविलेले काजळच खरेदी करावे. रोज रात्री बाळाच्या डोळ्यांतून काजळ काढा आणि हलके हाताने डोळे धुवा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.