आरोग्यानामा ऑनलाईन टीम : गुरुवारी आकाश निरभ्र राहणार असल्याने सूर्यग्रहण पाहता येईल, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले आहे. गुरुवारी (26 डिसेंबर) सकाळी आठ ते अकरा या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून 60 ते 70 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. मात्र, हे सूर्यग्रहण पाहताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. या नेत्रज्ज्ञांनी काय सांगितले आहे ते जाणून घेवूयात.
उद्याचे सूर्यग्रहण आणि डोळ्यांची काळजी कधी घ्यावी, याविषयी नेत्रविकार तज्ञ डॉ सुहास हळदीपूरकर यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यातून हे ग्रहण अधिक चांगल्या प्रकारे पाहता येणार आहे. तर उर्वरित भारतातून खंडग्रास दिसणार आहे. तब्बल 10 वर्षांनी हे सूर्यग्रहण पाहण्याची संधी आली असून पुढील सूर्यग्रहण पाहण्यासाठी 15 वर्षे वाट बघावी लागणार आहे.
काय करावे
1 नागरिकांनी हे सूर्यग्रहण पाहताना सौरचष्मे वापरणे अतिशय गरजेचे आहे.
2 या सौरचष्म्याने सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात.
3 सौरचष्म्यामुळे डोळ्यांना इजा अथवा ऍलर्जी होत नाही.
4 सूर्यग्रहणाविषयी चुकीचे समज- गैरसमज बाजूला ठेवून सुरक्षितपणे डोळ्यांची काळजी घेऊन सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घ्या.
काय करू नये
1 काळी काच, नेहमीच्या वापरातले गॉगल अथवा चष्मे, जुन्या एक्सरे फिल्म, अल्युमिनियम पेपर, दुर्बीण, कॅमेरा अथवा भिंगाचा वापर हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी करू नका.
Visit : arogyanama.com