पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – हृदय हा मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे .अशातच आजकाल अगदी किशोरवयीनांमध्येही हृदयविकार आणि हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे आपण पाहतो. खरंतर याला आजकालची जीवनशैली कारणीभूत आहे .वयाच्या चाळीशी पर्यंत हृदय चांगले काम करते. त्यानंतर शरीर प्रौढत्वाकडे वाटचाल करताना आजारपणाच्या कुरबुरी सुरु होतात. पण आता जसा काळ बदलत आहे. तसे किशोरवयीन देखील हृदयविकाराने त्रस्त आहेत .हृदयविकार म्हंटलं कि, दुसरी समस्या निर्माण होते औषध उपचारांची, हा आजार सामान्य माणसाला न परवडणारा आहे. त्यासाठीच आज आपण आयुर्वेदाने सांगितलेला मंत्र पाहुयात. निसर्गाने मानवी शरीराला वरदान ठरतील अशा अनेक वनस्पतींनाही जन्म दिला आहे.
असाच आयुर्वेदानाने महत्व सांगितलेला वृक्ष आहे पिंपळ. घराच्या बाहेर पडलं कि सहजासहजी सापडेल अशा पिंपळापासून हृदयाचे अमृत कसे बनवायचे ते पाहुयात. पिंपळाची कोवळी पाने ,जी अगदीच लहान (लाल ) नाहीत. आणि अगदीच ताठरलेली नाहीत अशी निवडून घ्या . १ महिन्याचे औषध बनवण्याच्या अंदाजाने १५ पाने तोडावीत . हि पाने स्वच्छ धुवून त्यांचे देठ आणि पुढचे टोक काढून टाकावेत. त्यानंतर हि पाने पाण्यात उकळायची आहेत. त्यासाठी ४ कप पाणी घ्या. आणि त्यात हि पाने तोपर्यंत उकळा जोपर्यंत ते ४ कप पाणी १ कप होईपर्यंत आटते . हा काढा थंड झाल्यानंतर गाळून घ्यावा. आणि काचेच्या बरणी मध्ये ठेवा.
पिंपळकाढ्याचे तीन डोस सकाळी ८ वाजता, ११ वाजता आणि २ वाजता म्हणजे दर तीन तासांनी घ्यायचे आहेत. डोस घेण्यापूर्वी पोट रिकामे असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यायचे आहेत. हा काढा हृदयरोग झालेल्या रुग्णांनी किंवा अगदी वयाच्या पस्तिशी नंतर सुरु केला तरी हृदय नेहमी तरुण ठेवता येईल.(आपल्या फ्यामिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )
हा काढा आयुर्वेदिक असल्याने कोणतेही साईडइफेक्ट नाहीत. आणि खर्चही नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असा हा उपचार आहे. त्यामुळे हृदयाच्या आकाराचे हे कोवळे पिंपळपान हृदयासाठी अमृत आहे.