आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाणा वाढत चालले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही समस्या मोठी असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हृदय हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. हृदय निरोगी नसल्यास जीवन धोक्यात येऊ शकते.
ही आहेत कारणे
१. शारीरिक व भावनिक तणाव हृदयरोगाला कारणीभूत ठरतो.
२. नियमित व्यायाम, योग, ध्यान याचा अभाव.
३. अयोग्य आहार घेणे.
४. जागरण आणि चूकीच्या सवयी
ही आहेत लक्षणे
१. अचानक छातीत दुखायला लागणे हे हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण आहे.
२. एक अथवा दोन्ही हात, कंबर, मान, जबडा अथवा पोट दुखणे आणि बेचैनी वाटणे.
३. श्वास घेताना त्रास होणे, घाम येणे, चक्कर येणे.
४. व्यायाम अथवा शारीरिक श्रमाचे काम करताना छातीत दुखणे.
५. सतत धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास हे हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत आहेत.
हे आहेत उपाय
१. दररोज व्यायाम करावा. यामुळे हृदय चांगले राहून हृदयरोगाच्या धोक्यापासून चांगला बचाव होऊ शकतो.
२. जीवनशैलीत आवश्यक बदल करून हृदयरोग होण्यापासून आपण वाचू शकतो.
३. हृदय चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे.
४. अल्कोहोल सेवनही अतिशय कमी केले पाहिजे.
५. हृदयाच्या आरोग्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. वजन वाढल्याने काही आजार होण्याची शक्यताही वाढलेली असते.
६. हिरव्या व ताज्या पालेभाज्या आहारात असाव्यात, ताजे फळेही खाल्ली पाहिजेत.