आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तिखट आणि गोड पदार्थ आवडणारे अनेक लोक असतात. अनेका लोक गोड पदार्थ दिसला की, स्वताला आवरू शकत नाहीत. परंतु हे गोड खाणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जास्त गोड खाल्ल्याने आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. जास्त गोड खात असाल या ५ गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.
जास्त तहान लागणे
शरीरात पाण्याची कमतरता सतत जाणवते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
दात दुखी
सतत गोड खाल्ल्याने दात खराब होतात. दातांच्या समस्या निर्माण होतात.
नेहमी आजारी असणे
साखर जास्त झाल्यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते.
वजन वाढणे
रक्तात साखरेच प्रमाण जास्त झालं की वजन वाढते.
तणाव आणि चिंता वाढणे
रक्तातील साखरेच प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते.