आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालल्याने अनेकांना स्वत:साठी सुद्धा वेळ मिळत नाही. सतत कामाच्या ओझ्याखाली राहिल्याने त्याचे परिणाम शरीर आणि मनावर हळूहळू दिसूल लागतात. परंतु, हे दुष्परिणाम लवकर लक्षात येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याकरता स्वत:साठी सुद्धा वेळ काढणे खुप महत्वाचे आहे, अन्यथ याचा वाईट परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. ज्या कामाला तुम्ही अतिमहत्त्व देताय, ते काम करण्याचीही क्षमता कमी होऊ शकते. तसेच तुमचे आयुष्यसुद्धा कमी होऊ शकते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर या संदर्भातील निष्कर्ष व्यक्त केले आहेत.
हे लक्षात ठेवा
१. वेळेचे नियोजन करा.
२. दिवसातली किमान काही मिनिटे तरी स्वत:साठी राखून ठेवा.
३. वेळेशी लढण्यातच शक्ती वाया घालवू नका.
४. वेळच नसल्याचे समजून एक अनामिक टेन्शन मानगुटीवर बसवून घेऊ नका.
५. शेड्यूल बिझी असणे यात आता नवीन काही नाही, उलट ती अपरिहार्य अशी गरज झाली आहे.
६. जबाबदाऱ्या अंगावर घेताना त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा.
७. कमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नंतर करा.
८. काही वेळ तुमच्यासाठी तुम्ही मोकळा ठेवलाच पाहिजे.
हे आहेत गंभीर परिणाम
* वेळेची सतत काळजी केल्याने अनेकांची अस्वस्थता वाढत जाते.
* मोकळा वेळ तुमच्याकडे नसेल तर कार्यक्षमता कमी होते. आयुष्यही कमी होते.