आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि इतर काही औषधी पदार्थ मिसळल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. याचे आश्चकारक असे परिणाम शरीरावर दिसून येतात. अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ टाकल्यास कोणकोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
संत्र्याची साल
एक बादली पाण्यामध्ये दोन संत्र्यांची साल टाकून ठेवा. दहा मिनिटांनी या पाण्याने आंघोळ करा. यामुळे मसल्स पेन आणि स्किन इन्फेक्शन दूर होईल.
कापूर
एक बादली पाण्यात दोन ते तीन कापूरचे तुकडे टाकून त्याने आंघोळ करा. यामुळे बॉडी रिलॅक्स होते. डोकदुखी दूर होते.
हळद
एक चमचा हळदीची पेस्ट बनवून बादलीभर पाण्यात टाकून आंघोळ करा. यामुळे त्वचेचे आजार दूर होतात.
चंदन
रात्री एका वाटीत चिमूटभर चंदन टाकून ठेवा. सकाळी आंघोळीच्या पाण्यात हे पाणी मिसळून आंघोळ करा. यामुळे त्वचेचे आजार दूर होतात.
तुरटी आणि काळेमीठ
एक बादली पाण्यामध्ये एक-एक चमचा तुरटी आणि काळेमीठ टाकून आंघोळ करा. यामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारते. तणाव आणि मसल्सचे दुखणे दूर होते.
कडुलिंबाची पाने
एक ग्लास पाण्यामध्ये आठ-दहा लिंबाची पाने उकळून नंतर हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात टाका. स्किन इन्फेक्शन आणि सूज दूर होते.
गुलाब जल
एक बादली पाण्यात तीन ते चार चमचे गुलाब जल टाकून आंघोळ करा. यामुळे मसल्स रिलॅक्स होतील. शरीर सुगंधीत होईल.