आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडीयाने सध्या सर्वांच्याच आयुष्यात बदल घडवला आहे. या माध्यमाशी अनेक लोक जोडले गेले आहेत. घरबसल्या एकाच वेळी हजारो लोकांशी जोडले जाण्याची संधी सोशल मीडियाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणामही अलिकडे दिसून येत आहेत. यापैकी काही दुष्परिणाम हे अतिशय गंभीर स्वरूपाचे सुद्धा आहेत. कुटुंबापासूनचा दुरावणे, मानसिकदृष्ट्या कमकुवत होणे, प्रत्यक्ष संवाद कमी होणे, डिप्रेशन, खरे मित्र कमी होणे, अशा समस्या जाणवू लागल्या आहेत.
ही आहेत कारणे –
१) सोशल मीडियाच्या अतिवापर.
२) कुुटुंबातील व्यक्तींचा आधार, प्रोत्साहन, पाठींबा न घेणे.
३) कौटुंबिक संवाद कमी होणे.
४) टेक्नॉलॉजीचा अतिरेक. नैसर्गिक संसाधनांपासून दूर जाणे.
ही काळजी घ्या-
१) पुस्तकांचे वाचन करा. भौतिक सुखाच्या मागे जाणे कमी करा.
२) निसर्गाच्या सान्निध्यात राहा.
३) बाहेरचे मन पाहण्यापेक्षा अंतर्मन पहा.
४) मनातील सौंदर्य बघा.
५) युवकांनी स्वत:ची प्रत्यक्ष ओळख निर्माण करा.
६) व्यापकता, स्वत:ची कौशल्ये ओळखावीत. नैसर्गिकता जपा.
७) डिप्रेशन घालवण्यासाठी स्वत:ची उर्जा निर्माण करा.
८) ठरवलेले ध्येय उद्देश ठेवून पूर्ण करणे आवश्यक आहे.