आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सध्या बहुतांश लोक सतत मोबाईल फोन जवळ बाळगतात. केवळ झोपल्यानंतर त्याचा वापर थांबतो. गरजेपेक्षाही आता हे एक व्यसन झाले आहे. काही लोक तर क्षणभरही मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत. परंतु, रात्री झोपतानासुद्धा तुम्ही स्मार्टफोन जवळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. चीनमधील इंस्टीट्यूट ऑफ एनबीसी डिफेंस अँड सिन्गुहा यूनिव्हर्सिटीने यासंदर्भात संशोधन केले आहे. या संशोधनानंतर संशोधकांनी मोबाईलच्या अतिवापराचे सांगितलेले धोके कोणते आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत धोके
१ स्मार्टफोनमधून मोठ्या प्रमाणात घातक गॅस निघत असतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
२ लिथियम-आयर्न बॅटरीमधून निघत असलेल्या शंभरहून अधिक विषारी गॅसमध्ये घातक अशा कार्बन मोनोऑक्साइडचाही समावेश आढळून आला आहे.
३ कार्बन मोनोऑक्साइडमुळे डोळे, त्वचा आणि नाकात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
४ हा गॅस शरीराच्या अवयवांना थेट हानी पोहोचवतो.
५ स्मार्टफोन गरम झाल्यानंतरही वापरणे, खराब चार्जरने चार्ज करणे, हे धोकादायक आहे.
६ मोबाईलच्या लिथियम ऑयर्न बॅटरीने आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
Visit : arogyanama.com