आरोग्यनामा ऑनलाईन टीम : मनाला वाटेल तेव्हा झोपायचे आणि उठायचे, ही सवय अनेकांना असते. रात्री उशीरा केव्हाही झोपायचे आणि सकाळी उशीरा केव्हाही उठायचे, असा अनेकांचा दिनक्रम असतो. परंतु, यामुळे शारीरासह तुमच्या मनावरही विपरित परिणाम होत असतो. मूडस्विंग्ज होणे, दिवस वाईट जाणे, दिवसभर उत्साहाचा अभाव, कंटाळा, असा त्रास होऊ शकतो. तसेच या सवयीचा तुमच्या करिअरवरसुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो, असे मेसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
हे आहेत दुष्परिणाम
१ झोपेचे शेड्युल ठरलेले नसल्यास झोपेचे चक्र बिघडते.
२ या सवयीमुळे पचनाचे तंत्र बिघडते.
३ अनेकदा दिवसभर मूड चांगला नसतो. चिडचिड, उदासिनता जाणवते.
४ कधीकधी आक्रमकता वाढते.
५ मूड प्रचंड स्विंग्ज होतात.
६ कामात लक्ष लागत नाही.
७ दिवसभराच्या कामाचा दर्जा बिघडतो.
८ प्रगतीवरही विपरीत परिणाम होतो.
हे लक्षात ठेवा
आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असल्यास झोपेच्या वेळा पाळणे आवश्यक आहे.
Visit : arogyanama.com