आरोग्यनामा ऑनलाइन : उन्हाळ्यात सर्वच पदार्थ लवकर खराब होतात. पदार्थांमध्ये बॅक्टेरियांची वाढ जलदगतीने होते. यासाठी उन्हाळ्यात बाहेरचा आहार घेणे टाळावे. अन्यथा त्याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होत असल्याने फूड पॉइझनिंगचा त्रास होऊ शकतो. हा त्रास टाळायचा असेल तर काही घरगुती उपाय करावे+.लवकर आराम मिळतो.
लिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुण असल्याने लिंबू- पाणी प्यायल्याने बॅक्टेरिया मरतात. अनशापोटी लिंबू-पाणी प्यावे. शक्य असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिता येईल. मात्र, पाणी शुद्ध आणि स्वच्छ असावे. दह्यात सुद्धा अँटिबायोटिक गुणधर्म आहेत. यामध्ये थोडे काळे मीठ घालून त्याचे सेवन केल्यास आराम मिळेल. यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता कमी असते.
तसेच लसणामध्ये अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १-२ पाकळ्या पाण्यासह घेतल्याने आराम पडतो. तुळशीत आढळणारे अँटिमिकोबियल गुणधर्म सूक्ष्मजीवांचा सामना करतात. तुळस अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करता येईल. एक वाटी दह्यात तुळशीचे पान, काळी मिरी आणि मीठ घालून सेवन करू शकता किंवा चहात तुळशीचे पान टाकून सेवन करू शकता.