आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खोकला हा सामान्य आजार असला तरी त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण तो कधी-कधी गंभीर रूप धारण करू शकतो. कारण याचे रुपांतर दम्यात होऊ शकते. जगात दम्याने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
ही आहेत दम्याची लक्षणे
१. रात्रीच्या वेळी घाम येतो.
२. थंडी वाजून येते.
३. छातीत दुखायला लागते.
४. श्वास घ्यायला त्रास होतो आणि श्वासोच्छवासही जलद होतो.
५. भूक कमी होते.
६. खोकला जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांकडे जा.
७. खोकल्यातून हिरवा, पिवळा कफ किंवा रक्त येणे हे धोक्याचे लक्षण.
८. वजन झपाट्याने कमी होणे.
९. खूप थकवा जाणवणे.
१०. खोकल्यासोबत ताप येणे.