आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर निरोगी आणि ताकदवान होण्यासाठी बदाम, मनुके आणि काजू खावेत, असे सांगितले जाते. परंतु हाच सुकामेवा कधी कधी अपायकारक ठरू शकतो. कारण सुकामेवा हा शरीराला आवश्यक तेवढाच सेवन केला पाहिजे. अन्यथा आरोग्य बिघडू शकते. जास्त प्रमाणात काजू, बदाम खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
पोटाच्या समस्या
अधिक प्रमाणात सुकामेवा खाल्ल्यास पोटात बद्धकोष्ठता आणि गॅस निर्माण होतो. डायरिया आणि पोटाच्या समस्या होऊ शकतात.
डोके जड पडणे
मेंदूच्या नसांमध्ये उष्णता निर्माण होते आणि डोके जड होते. नीट झोपही येत नाही.
तोंडाच्या समस्या
दातात अडकल्याने तोंडाची दुर्गंधी, तोंडात संक्रमण होणे आणि दात पिवळे होतात.
मधुमेह
डायबिटीसच्या रूग्णांनी जास्त प्रमाणात सुका मेवा खाऊ नये.
चरबी
जास्त प्रमाणात खाल्ल्यास कमरेच्या आजूबाजूला चरबी जमा होते. कारण यामध्ये वजन वाढविणारी तत्वे असतात.