आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शारीरिक आजार नसताना केवळ तणावामुळे काही लोक शारीरिक आजार आहे, असा गैरसमज करून घेतात. मनोशारीरिक या नावाने हा आजार ओळखला जातो. जगभरात तब्बल ८० टक्के लोक या विकाराने ग्रस्त आहेत. अशा व्यक्तींना शारीरिक व्याधी नसतानाही आजारी असल्याची भावना होते. काहीवेळा तर वेदनाही होतात. मात्र, वैद्यकीय तपासणीत काहीच आढळत नाही.
ही आहेत कारणे आणि लक्षणे
१ सतत मानसिक ताणतणावात रहाणे.
२ कमी वयात वाढत्या अपेक्षांची परिणती तणावात होते आणि त्यातून आजार रुग्णाला जडल्याची भावना निर्माण होते.
३ पोटात गाठ आहे, छातीत सतत वेदना होत आहेत, सतत डोके दुखते, हात पाय थरथरणे अशी लक्षणे रुग्णाला जाणवतात.
४ हे रुग्ण रोज अपचन होते, अंग दुखते म्हणून गोळीची सवय करतात.
५ एका पातळीला या रूग्णांना त्रास होवो अथवा न होवो गोळ्या घेतल्याशिवाय चैन पडत नाही.
हा आहे उपाय
१ तज्ज्ञांकडून समुपदेशन घेणे.
२ मानसिक तणाव कमी करणे.
Visit : arogyanama.com