पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – श्वास हा आपल्या शरिरातील उर्जेचा महत्वाचा स्त्रोत आहे. योग्य पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना पळवून लावतो. योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवतो. व तुमचे शरीर आणि मन संतुलित करतो. तसेच मधुमेह आणि हृदयरोग याची कीड आपल्या शरीराला लागू नये. आणि तुम्हाला निरोगी आयुष्य जगता यावे. म्हणून खालील प्राणायाम तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी रिकाम्या पोटी करु शकता.
१) कपालभारती प्राणायम :
बुद्धीला तेज आणणारे असे या प्राणायामाचे तंत्र आहे. हे तंत्र आपले शरीर व मन दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत करते. या प्राणायमाच्या प्रकारात उच्छावासाद्वारे आपल्या शरीरातील ८० टक्के विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. या प्राणायामाच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते. या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये उर्जा निर्माण होते. विशेषत: मधुमेहींना याचा अधिक फायदा होतो. तसेच चयापचय प्रक्रिया सुधारते सहाजिकच त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने चेहऱ्यावर तेज निर्माण होते.
२) शितली प्राणायाम :
शितली या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे थंड. शितली हा प्राणायामाचा प्रकार तुमच्या शरीराला थंडावा देतो. या प्राणायामात हवा तोंडावाटे आत घेतली जाते. व नासिकांमार्फेत बाहेर सोडली जाते. जीभेवाटे श्वास आत घेतल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते. प्राणायामाच्या या प्रकारामुळे पित्तविकार तसेच चिडचिड कमी होते. आणि आपले मन शांत राहिले तर आपल्यावर कोणताही तणाव येत नाही. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. आणि हा प्राणायम जर नियमित केला. तर उच्च रक्तदाब देखील नियंत्रित राहतो.
३) अनुलोम विलोम प्राणायाम :
अनुलोम विलोम हा प्राणायामातील असा एक प्र्कार आहे की, ज्यामुळे मन शुद्ध होते. ताणतणावातून त्वरीत आराम मिळतो. यामुळे अवयवांना संरक्षण मिळते. व मज्जासंस्था बळकट होते. फुफ्फुसे निरोगी होतात. व संपुर्ण शरीराला मुबलक ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीराला आंतरिक थंडावा मिळतो. नियमितपणे केलेल्या या प्राणायामाच्या सरावाने मज्जासंस्थेला देखील आराम मिळतो.