आरोग्यनामा ऑनलाइन – ऋतुमानानुसार निसर्ग जसा बदलतो तसाच बदल मानवी आरोग्यावरही होतो…. आणि हा बदल शरीराला सहज सोपा होण्यासाठी निसर्गाने आपण होऊनच अनेक उपाय करून ठेवले आहेत जसे थंडीत शरीराला उष्णता देणारा आहार घ्यावा, उन्ह्याळात कलिंगडा सारखे फळे मोठ्या प्रमाणात सेवन करावे …. या आणि अश्या उपायांनी शरीर ज्या त्या ऋतूतील बदलांना योग्य प्रतिसाद द्यायला तयार होते.. त्याच प्रमाणे कोणत्या ऋतूत कोन कोणती फळे सेवन करावे व त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याचीही योग्य माहिती असेल तर मग क्या कहने…
सर्व ऋतुंमध्ये उन्हाळा हा आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकालाच त्रासदायक ठरतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण थंड पाणी, शीतपेय किंवा आईस्क्रीम खातो, पण हे खाण्यापेक्षा नैसर्गिक फळे खाणे किंवा त्यांचा रस पिणे हे फायदेशीर मानलं जातं. यामधून पोषक घटक शरीराला मिळतात आणि उन्हाळ्यात शरीरामध्ये, योग्य ती पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात या फळांचा आहारात समावेश करा.
कलिंगड
कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर हे फळ उपयुक्त आहे. उन्हाळ्यात कलिंगडाच्या सेवनाने शरीराला गारवा मिळतो. कलिंगडामध्ये अ, ब आणि क जीवनसत्व असतात, तसेच पाण्याचे प्रमाणही अधिक असते. कलिंगड शरीरातील आद्रता टिकवून ठेवते, ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहतं. तसेच घामतून शरीरातील झालेल्या खनिज द्रव्यांचा ऱ्हास कलिंगडामुळे भरून निघतो. कलिंगडामध्ये पाण्यासोबत पोटॅशियमचे प्रमाण देखील अधिक असते. यामुळे मुतखडा, आम्लपित्त, उष्माघातामुळे होणारा त्रास, तळपायाची आग यावर कलिंगड हितकारक असते. कलिंगडामध्ये लाईकोपिन नावाचे फायटो केमिकल असते जे शरीरातील कर्करोगाला प्रतिबंधक मानले जाते.
कलिंगडाचे फायदे
आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर कलिंगड फायद्याचं
शरीराला थंडावा मिळतो
शरीरातील आद्रता टिकून राहते
शरीराचे तापमान संतुलित राहते
पाण्यासोबत पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते
द्राक्ष
उन्हाळ्यात फिट रहायचंय, मग ही फळं खा!सोर्स-एका पेराग्वे, गुगल
उन्हाळ्यात द्राक्ष मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळी, हिरवी आणि लाल अश्या तीन प्रकारची द्राक्ष असतात. काळ्या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म अधिक प्रमाणात असतात. दाहनाशक, तृप्तीदायक, श्रमहारक तसेच ज्वराघ्न असे गुण द्राक्षांमध्ये आढळतात. द्राक्षांमद्दे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यासोबतच ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. द्राक्ष्यातील फलशर्करा नैसर्गिक असल्यामुळे शरीराला उर्जा व उत्साह मिळतो. द्राक्षांच्या बियांमध्ये रेसव्हिट्रॉल आढळते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी द्राक्ष अतिशय उपयुक्त असून पचनाच्या तक्रारीही दूर होतात. उन्हाळ्यातील दाह, अर्धशिशी, आम्लपित्त, मूळव्याध या आजारांसाठी द्राक्ष अत्यंत उपयुक्त असते.
द्राक्षाचे फायदे
काळ्या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतात
द्राक्षांमध्ये दाहनाशक, तृप्तीनाशक, श्रमहारक गुण असतात
द्राक्षांमध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि क जीवनसत्व असते
द्राक्षांच्या बियांमध्ये उपयुक्त असे रेसव्हिट्रॉल आढळते
लिंबू
लिंबू हे औषधी फळ आहे. उन्हाळ्यात लिंबाचे सेवन हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. लिंबू सरबत हे उन्हाळ्यातील एक उत्कृष्ट शितपेय आहे. शरीरातील उष्णता लिंबू सरबताने कमी होते. लिंबाचा उपयोग हा शरीरातील आम्लपित्त कमी करण्यासाठी होतो. लिंबाचे सेवन केल्याने अॅसिड-अल्कली यांचा योग्य समतोल राखला जातो. मुतखडा, यकृताचे आजार, आतड्यांचे आजार यांवर लिंबू गुणकारी आहे. लिंबामध्ये ‘क’ जीवनसत्व असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जुलाबावरही लिंबू सरबत अत्यंत उपयुक्त आहे.
लिंबाचे फायदे
लिंबू सरबताने शरीरातील उष्णता कमी होते
शरीरातील आम्लपित्त कमी होण्यास मदत होते
लिंबामुळे अॅसिड-अल्कली यांचा योग्य समतोल राखला जातो