आरोग्यनामा ऑनलाइन टीम : सौंदर्यासाठी महिला अनेक उपचार घरगुती पद्धतीने करत असतात. अशा महिलांसाठी ही उपचार पद्धती खूपच लाभदायक आहे. मिठाचे पाणी सौंदर्याच्या अनेक तक्रारी दूर करते. पाणी आणि मीठातील काही घटक त्वचा आणि केसांसाठी उपयोगी आहेत. अंघोळीच्या पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळावे. पाण्यात मीठ मिसळून दोन वेळा चेहरा धुतल्याने अनेक फायदे मिळतात.
मीठाच्या पाण्यात मिनरल्स, सोडियम असते. हे पाणी कापूसाने चेहऱ्यावर लावावे. यामुळे सावळेपणा दूर होतो. तसेच यामुळे त्वचेचे हार्मफुल बॅक्टेरिया दूर होतात. दिवसातून दोन वेळा हे पाणी चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स लवकर बरे होतात. या पाण्यात कॉपर झिंक असते. त्यामुळे या पाण्याने केस धुतल्यास केस गळतीची समस्या दूर होते. तसेच यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो. या पाण्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होते. सुरकुत्यांपासून बचाव होतो.
या पाण्यात अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. हे कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. कोंडा दूर होतो. तसेच यामध्ये ऑइल कंट्रोलिंग प्रॉपर्टीज असतात. या पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुतल्यास तेलकटपणा निघून जातो आणि चेहरा चमकतो. यामध्ये असलेल्या अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे व्रण आणि खाज दूर होते. या पाण्यात यामध्ये मिनरल्स असतात. मिठाच्या पाण्यात कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांभोवतीचे काळे डाग दूर होतात. मिठाच्या पाण्यातील मॅग्नेशियमने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. हे कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. त्वचेचा मुलायमपणा वाढतो. यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. या पाण्यात थोडावेळ पाय बुडवून ठेवल्याने पायांच्या भेगा दूर होतात. असे अनेक फायदे मीठाच्या पाण्यामुळे होत असल्याने याचा उपयोग केल्या सौंदर्य वाढते.