आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारात अनेक महागड्या क्रिम्स तसेच औषधेसुद्धा उपलब्ध असतात. परंतु, इतके महागडे उपाय करूनही अनेकदा निराशाच पदरी येते. परंतु, घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने आणि तेही एकही पैसा न खर्च करता तुमच्या सौंदर्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी आवश्यक आहे फक्त मीठ आणि पाणी. याचे कोणते फायदे आहेत, आणि हे उपाय कसे करायचे, याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत फायदे
१) तेलकट त्वचा
मीठ आणि पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा. तेलकटपणा निघून जातो आणि चेहरा चमकतो. यात ऑइल कंट्रोलिंग प्रॉपर्टीज असतात.
२) व्रण
हे कापसाच्या मदतीने त्वचेवर लावल्याने यातील अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे व्रण आणि खाज दूर होते.
३) काळी वर्तुळे
मिठाच्या पाण्यात कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने यातील मिनरल्समुळे डोळ्यांभोवतीचे काळे डाग दूर होतात.
४) मुलायम त्वचा
हे कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावल्याने यातील मॅग्नेशियममुळे त्वचेचा मुलायमपणा वाढतो.
५) पायांच्या भेगा
या पाण्यात थोडावेळ पाय बुडवून ठेवल्याने यातील अँटी फंगल प्रॉपर्टीजमुळे पायांच्या भेगा दूर होतात.
६) सावळेपणा
या पाण्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावल्याने यातील मिनरल्स, सोडियममुळे सावळेपणा दूर होतो.
७) पिंपल्स
यामुळे त्वचेचे हार्मफुल बॅक्टेरिया दूर होतात. दिवसातून दोन वेळा हे पाणी चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स लवकर ठिक होतात.
८) केसगळती
या पाण्याने केस धुवा. केस गळतीची समस्या यातील कॉपर झिंकमुळे दूर होते.
९) सुरकुत्या
यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो. यामध्ये कापूस बुडवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होते. सुरकुत्यांपासून बचाव होतो.
१०) कोंडा
हे कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. कोंडा दूर होतो.