आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भात खाल्ल्यामुळे वजन वाढते, असा समज असल्याने वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे अनेकजण भात खाणे बंद करतात. परंतु, हा चुकीचा समज आहे. भात हे असे एकमेव अन्न आहे, जे संपूर्ण जगात सेवन केले जाते. माणसाला जगवण्याची ताकद यामध्ये आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी भात खाणे उपयोगी ठरू शकते.
जाणून घ्या कारणे
१) वजन वाढविणारे तसचे शरीराला हानीकारक असे कोणतेही घटक भातामध्ये नाहीत.
२) शरीरावर कोणतेही नकारात्मक परिणाम होऊ न देता, पोषकतत्त्व भातातून मिळतात.
३) जगात केवळ भात हा असा एकच अन्नपदार्थ आहे, जो अगदी थोड्या प्रमाणात खाल्ला तरी माणून जिवंत राहू शकतो. शिवाय, आरोग्य सुद्धा चांगले राहू शकते.
४) कोलेस्टोरॉल, सोडियम यासारखे घटकही भातात नाहीत.
५) भात हा संतुलित आहार आहे.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)