आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यात सुद्धा काही किरकोळ आजार नेहमीच त्रासदायक ठरत असतात. यासाठी हिवाळ्यात सुद्धा आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने तहान कमी लागते. कमी पाणी प्यायल्याने शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया कमी होते. यामुळे आजारांना निमंत्रण मिळू शकते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पाण्याऐवजी पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन करा.
हे पदार्थ सेवन करा
१. सलाड
गाजर, काकडी, मुळा, टोमॅटोचे सलाड याकाळात जास्त सेवन करा. यातून भरपूर प्रमाणात पाणी शरीराला मिळेल.
२. भात
शिजवलेल्या तांदळात ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी याचे सेवन करा.
३. ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये ८९ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ब्रोकोली उकडून खाल्ली, तरी अनेक फायदे होतात.
४. फळे
सफरचंद, संत्र, मोसंबी, अननस, दाक्षे, ब्ल्यू बेरी, स्टॉबेरी, कलिंगड यांच्या सेवनानेही हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.
५. लिंबू
लिंबामध्ये विटॅमीनचे प्रमाण भरपूर असल्याने ते शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकण्यास मदत करते.
६. दही
हिवाळ्यात सकाळच्या नाष्ट्यात दही किंवा लस्सी घेतल्याने शरीराची पाण्याची गरज पूर्ण होते. यात ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.
७. पालक
पालकमध्ये प्रोटीन, विटॅमीन, आयर्नबरोबर पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील पाण्याची कमरता दूर होते.