आरोग्यनामा ऑनलाईन टीम – किडनी हा आजार आपल्याला एकदम शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहचला कि आपल्याला जाग येते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण किडनी जोपर्यंत सगळी खराब होत नाही. तोपर्यंत तीच काम चालू असत. पण जेव्हा ती पूर्ण खराब होते. तेव्हा तीच कार्य बंद पडत आणि आपल्याला त्रास जाणवू लागतो. रोजच्या दैनंदिन जीवनातील चुकांमुळे किडनी खराब होते. जाणून घेऊया ही कारणे.
किडनी खराब होण्याची कारणे खालीलप्रमाणे :
१) जर तुम्हाला उच्च रक्तदाबा सोबत मधुमेह देखील असले तर तुमच्या किडनीचे आरोग्य धोक्यात आहे. उच्च रक्तदाबामुळे किडनीजवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमकूवत होतात. त्यामुळे किडनीला कार्य कारणासाठी पुरेशा रक्ताचा पुरवठा होत नाही. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे किडनीला ऑक्सिजनचा व पौष्टीक घटकांचा कमी पुरवठा होतो. आणि किडन्या खराब होऊ लागतात.
२) मधुमेहाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होते. किंवा शरीराची हार्मोन्स वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. याचा परिणाम किडनीवर होतो. कारण किडनीला अधिक रक्त फिल्टर करावे लागते. अनेक वर्षे कामाच्या अतिरिक्त भारामुळे किडनीमधील छोट्या रक्तवाहिन्याचे कार्य मंदावते.
३) आहारात अधिक प्रमाणात प्रोटिन्स घेतल्याने कालांतराने किडनीचे आजार होतात. कारण प्रोटीन मेटाबोलिसम झाल्यानंतर ब्लड युरिया नायट्रोजन नावाचा टाकाऊ पदार्थ तयार होतो. जो गाळून वेगळा करण्याचे कार्य किडनीचे असते. आणि हा टाकाऊ पदार्थ अधिक प्रमाणात तयार झाला तर किडनीवर अतिरिक्त कामाचा भार येतो. युरिया किडनीचे टाकाऊ पदार्थ गाळण्याच्या यंत्रणेत बिघाड करते. आणि हा बिघाड पुन्हा भरून काढता येत नाही.
४) पेनकिलर्स घेण्याने किडनीवर परिणाम होतो. कारण ही औषधे किडनीकडून उत्सर्जित झाल्यावर त्याचे विघटन करण्याचे कार्य यकृताचे असते. आणि मग ते पचन नलिकेत सोडले जाते. अती प्रमाणात पेनकिलर्स घेतल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. आणि किडनी खराब होते.