आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या पावसाळा सुरू आहे. या दिवसांत आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. कारण या काळात जंतू आणि बॅक्टेरियांची वाढ जलद होते. तसेच आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. या काळातील आजारांपासून दूर रहायचे असल्यास काही महत्वाच्या टिप्स कायम लक्षात ठेवा.
या टिप्स लक्षात ठेवा
* पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नका. पाणीपुरी, भेळपुरी आणि सँडवीच यामध्ये बॅक्टेरियांची त्वरित निर्मिती होते. यामुळे आजार होतात. उघड्यावरील कापलेली फळे आणि भाजीपाला खाऊ नये. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता आहे.
* भाजीपाला मिठाच्या गरम पाण्याने धुवून काढा. भाज्या उकळून कराव्यात. याने सूक्ष्म जंतू नष्ट होतील. तसेच भाजीवर लागलेला आर्टिफिशियल कलर, टेक्स्चर आणि फ्लेवरही निघून जाईल.
* इम्युनिटी वाढवण्यासाठी लसूण सेवन करा. आहारात जॅसमिन टी आणि ग्रीन टी घ्या. मासे सेवन करणे शक्यतो टाळा.
* पावसात भिजल्यानंतर घरी येऊन स्नान करावे. याने संसर्गाचा धोका कमी होतो. पाणीही खूप प्या. कारण शरीर जास्त विषाक्त पदार्थ बाहेर काढू शकेल. पिण्याच्या पाण्यात क्लोराइड मिसळून पाणी पिल्यास चांगले असते.
* घरात स्वच्छता ठेवा. घराच्या जवळपास किंवा लॉन आदीत अशुद्ध, गढूळ पाणी जमू देऊ नका. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक होत नाही, त्यासाठी घरात अवश्य व्यायाम करा.