आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्याकडे बाळ आणि बाळंतिणीची विशेष काळजी घेतली जाते. मात्र, ही काळजी घेण्याच्या पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिसून येतात. मातृत्व ही महिलांसाठी जीवनातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. मातृत्त्वाचे हे क्षण त्या स्त्रीसह संपूर्ण कुटुंबासाठीही आनंददायी असतात. त्यामुळेच गर्भवती महिलेची सर्वजण अधिक काळजी घेतात.
गरोदरपणात तसेच बाळंतपणानंतर बाळ आणि मातेची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे असते. ही काळजी विविध प्रकारे घेतली जाते. तसेच याबाबत विविध उपाय आपल्याकडे आढळून येतात. असे म्हटले जाते की, गौरवर्णीय पुत्राच्या प्राप्तीसाठी गरोदरपणात नऊ महिने जेवणानंतर बडीशेप चावून खाल्ल्याने येणाऱ्या बाळाचा वर्ण उजळतो आणि सौंदर्य वाढते.
तसेच दररोज नाष्ट्यात एक आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने बाळाचा वर्ण उजळतो. शिवाय, बाळ-बाळंतिणीचे आरोग्य चांगले राहते. बाळाची पचनशक्ती वाढविण्यासाठी बाळाला दूध पाजण्यापूर्वी आईने एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे मुलाला दूध लवकर पचते. तसेच उलट्या, जुलाब वगैरे होत नाही.