पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – देशातील सर्वात जास्त गरिबी हि खेड्यात व आदिवासी भागात आहे. आणि सर्वात जास्त आजारही खेड्यात आणि आदिवासी भागात आहेत. त्यामुळे खेड्यात आणि आदिवासी भागात योगाची जास्त गरज आहे. योगामुळे खेड्यातील आणि आदिवासी भागातील आजार कमी झाले तर गरिबी होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त झारखंडच्या रांचीमध्ये योग केला त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले कि, खेड्यात आणि आदिवासी भागात योगा पोहचला पाहिजे. कारण योग सर्वांचा आहे आणि सर्व योगाचे आहेत. तसेच गरिबांना आजाराच्या खूप समस्या असतात. त्यामुळे त्यांनी जर योग केला तर त्यांना आजार होणार नाहीत. आणि खेड्यातील गरिबी दूर होईल. गेल्या ५ वर्षांत योगला हेल्थ आणि वेलनेस सोबत जोडून आपल्या सरकारने याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचा मजबूत स्तंभ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. असेही मोदी म्हणाले.
योगदिनाची संकल्पना योगा फॉर हार्ट केअर आहे. हार्ट केअर हे सगळ्या जगासाठी एक खूप मोठंआव्हान बनलं आहे. भारतात सध्या अनेक आजारांनी तोंड काढला आहे. अनेकांना तरुण वयातच हृदयाचे आजार होत आहेत. त्यामुळे योगा हा सध्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा झाला आहे. सध्याची तरुण पिढी आधुनिकतेसोबत जुन्या परंपरेला जोडते तेव्हा चांगलं वाटत. तरुणाच्या नवीन विचारामुळे योगा अधिक जिवंत झाला आहे. असं मोदी म्हणाले.