पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पावसाळा सुरु झाला कि सगळ्याना खूप बर वाटत. मुबलक पाणी भेटत, उकाड्यापासून सुटका होते, निसर्ग हिरवा गार होतो. पण त्यासोबतच पाऊस हा अनेक आजारांना घेऊन येतो. पावसाळा सुरु झाल्यावर डेंगू, मलेरिया, हिवताप या आजारांना लगेच आमंत्रण मिळत. आणि सगळीकडे रोगराई पसरते. कारण पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. काही अडचणीच्या ठिकाणी डास विश्रांती घेतात. आणि रात्री चावतात. या डासांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तसेच पावसाळ्यात डासांच्या आळ्या होतात. आणि डासांमुळे वेक्टर बॉर्न डिसीजचा प्रसार होतो.
डासांमुळे होणाऱ्या या आजारांना आळा घालायचा असेल तर खालील उपाय करा. जेणेकरून डेंगू, मलेरिया, हिवताप या आजारांना आमंत्रण मिळनार नाही. आणि महत्वाचे म्हणजे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहील.
१) पाऊस पडल्यानंतर घराजवळ पाण्याची डबकी साचून देऊ नयेत. यावर वेळीच औषध फवारणी केली तर डास होणार नाहीत.
२) शक्य असल्यास मच्छरदानीचा वापर करा.
३) मलेरियाची साथ असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालावेत.
४) डास चावू नये म्हणून शक्य असल्यास क्रिम लावावेत.
५) पाणी साचणायसाठी शोषखड्डे तयार करावेत.
६) बंद गटारे तयार करण्यावर भर दया. जेणेकरून गटारातील डास वर येणार नाहीत.
७) सूर्य उगवण्याआधी आणि मावळायच्या वेळी घराबाहेर बाहेर पडू नका.
आणि महत्वाचं म्हणजे स्वत:च एखाद्या आजाराचं निदान करून त्यावर औषधोपचार करणं टाळा. आणि वर दिलेले घरगुती उपाय करा जेणेकरून पावसाळ्यात होणाऱ्या या आजारांना आळा बसेल.