आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात अनेकजण ताप, सर्दी खोकला अशा आजाराने त्रस्त राहतात. यामुळे पावसाळ्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी मौसमी फळ लाभदायक ठरतात. पावसाळ्यात नाशपाती फळाचे सेवन केल्यास विविध आजार आपल्यापासून दूर राहू शकतात. नाशपातीमध्ये सफरचंदासारखे औषधी गुण आढळून येतात. हे फळ रोग प्रतीकारक तंत्र मजबूत ठेवते. याच्या नियमित सेवनाने सर्दी, खोकला, ताप असे आजार होत नाहीत.
१) हाडांसाठी लाभदायक :
नाशपातीमध्ये जास्त प्रमाणात बोरॉन आढळून येते. बोरॉन हाडांमधील कॅल्शियम स्तर काय ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हे फळ आरोग्यासाठी गुणकारी आहे.
२) सूज कमी होते :
नाशपातीचे ज्यूस अर्थराइटिसच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे. यामुळे सूज कमी होते. अर्थराइटिसने त्रस्त असेलेल्या लोकांनी नियमितपणे या फळाचे ज्युस घ्यावे.
३) आतड्यांसाठी फायदेशीर :
नियमितपणे नाशपातीचे ज्यूस पिल्यास आतड्यांमध्ये झालेली गडबड नियंत्रित केली जाऊ शकते. याचे ज्यूस दिवसातून दोन वेळेस पिल्यास कफ कमी होतो आणि गळ्यातील खरखर दूर होते.
४) थकवा दूर करण्यासाठी :
नाशपाती खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज ऊर्जेमध्ये रुपांतरीत होते. जेव्हाही तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा नाशपाती खाल्ल्यास लगेच शरीराला उर्जा मिळेल. नाशपातीचे ज्यूस शरीरातील तापमान कमी करून तापेमध्ये आराम पोहचवते.
५) डायबिटीज नियंत्रण :
नाशपाती हे फळ फायबरयुक्त असल्यामुळे डायबिटीज रुग्णांसाठी औषधीप्रमाणे काम करते. यामुळे गोड खाण्याची इच्छा होत नाही.