आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पाणीपुरीच्या गाडीसमोरून जाताना कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते आणि त्या व्यक्तीला पाणीपुरीचा मोह आवरता येत नाही. पाणीपुरी हा खूप आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. कारण त्यात तिखट, आंबट, खारट या सर्व चवी आपल्याला मिळतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत पाणीपुरी ही सगळीकडे आवडीने खाल्ली जाते. पण पाणीपुरी खाल्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
१) खूप आवडीने सेवन केल्या जाणाऱ्या पाणीपुरीमुळे डायरिया, डिहाइड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर बाहेरील पाणीपुरी खात असाल तर सावधान कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असते.
२) काहींना पाणीपुरी खूप आवडते त्यामुळे ते पाणीपुरी खूप जास्त प्रमाणात खातात. पण तुम्हाला माहित आहे का पाणीपुरी खाल्याने तुमच्या लिव्हरवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
३) आपण बाहेर गाडीवर पाणीपुरी खातो. ती गाडी उघड्यावर असल्यामुळे तिथे असणाऱ्या पाणीपुरीच्या साहित्यावर खूप धूळ बसते आणि ते दुकानदार स्वच्छतेकडे मुळीच लक्ष देत नसल्याने याचे सेवन केल्याने उलटी, जुलाब, कावीळ सारखे आजार होऊ शकतात.
४) अधिक प्रमाणात पाणी पुरीचे सेवन केल्याने अल्सर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर अधिक प्रमाणात पाणीपुरीचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत.
५) जास्त प्रमाणात पाणीपुरी खाल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच पोटदुखी आणि आतड्यांमध्ये सूज येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पाणीपुरी खाण्याचा अतिरेक टाळणे हेच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते.