आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पालकाची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अनेकवेळा आहारतज्न आपल्याला पालकाची भाजी खाण्याचा सल्ला देतात. पण या भाजीसोबतच भाजीचा रासही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकाच्या भाजीच्या रसाने आपले आजार नियंत्रणात येतात. त्यामुळे पालकाच्या भाजीचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
१) पालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो.
२) पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
३) पचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते.
४) त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा.
५) पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.
६) पालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.