आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मजबूत शरीरासाठी खारीक खूप गुणकारी फळ आहे. वातावरणात गारवा असताना खारकेचे केलेले सेवन खूप पौष्टिक असते. पचनशक्ती चांगली असल्यास खारीक जास्त प्रमाणात खाता येते. खारीक वाळलेल्या स्वरुपात वर्षभर उपलब्ध असतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खजूराला संस्कृत आणि हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात. खजूर हे विविध आजारांवर रामबाण उपाय असून हे उपाय कसे करावेत, याची माहिती घेवूयात.या आजारांवर आहे खारीक गुणकारी –
सर्दी
सर्दीने झाली असल्यास खारीक टाकून दूध उकळावे. त्यामध्ये विलायची पूड टाकून हे दूध सेवन करावे. या उपायाने सर्दी लवकर बरी होते.नपुंसकता
खारीकेच्या सेवनाने पुरुषांमधील नपुंसकता दूर करता येते. या समस्येवर खारीक हा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी नियमित खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसèया आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन केल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.अॅनिमिया
खारीक नियमित खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. खारीक हाडांसाठी पोषक असते.
सर्दीने झाली असल्यास खारीक टाकून दूध उकळावे. त्यामध्ये विलायची पूड टाकून हे दूध सेवन करावे. या उपायाने सर्दी लवकर बरी होते.नपुंसकता
खारीकेच्या सेवनाने पुरुषांमधील नपुंसकता दूर करता येते. या समस्येवर खारीक हा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी नियमित खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसèया आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन केल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.अॅनिमिया
खारीक नियमित खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. खारीक हाडांसाठी पोषक असते.
अशक्तपणा ,सांधेदुखी
पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्तपणाने कंबर दुखणे, असा त्रास होत असल्यास खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते. बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून रात्री झोपताना हे दुध सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.
दमा, अर्धांगवायू
खारीक नियमित खाल्ल्यास दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो. अर्धांगवायूचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो.
भूक वाढवणे
भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावी. हे दुध खूप पौष्टिक असते, अन्न व्यवस्थित पचते.