आरोग्यनामा ऑनलाईन टीम – या पावसाळ्यात सगळ्यात जास्त आरोग्य वृद्धांना जपायची गरज असते. सगळ्यात आधी आजार वृद्धांपासूनच चालू होते. कारण त्यांच्यात असणाऱ्या कमी प्रतिकारक शक्तीमुळे या समस्यांना त्यांना तोंड द्यावा लागतो. तर चला जाणून घेऊ या पावसाळ्यात वृद्धांनी कशा प्रकारे आपली आरोग्याची काळजी घेऊ शकता
पावसाळ्यात वृद्धांना जास्त प्रमाणात पाठ, कंबर, गुडघे दुखतात. आयुर्वेदात सुरुवातीपासूनच आवळ्याला फार महत्त्व दिले आहे . अशा या आवळ्याचा वापर करून या त्रासापासून दूर राहू शकता. तसेच खारीकची पूड टाकून उकळलेले दूध रोज प्यावे, खजूर खाणे, ताज्या फळांचा रस घेणे किंवा फळे खाणे, पाणी व्यवस्थित पिणे, थंडीपासून स्वतःचा बचाव करणे. अशा गोष्टीमुळे तुम्ही आजारांपासून लांब राहू शकता.
वृद्धांनी या काळात नाकात तुपाचे थेंब टाकणे, तोंडात सुमुख तेलासारख्या तेलाचा गंडूष करणे, कानात तेल टाकणे, डोळ्यात औषधी तेल वा तूप घालणे यामुळे नाक, कान, डोळे, मुख व टाळू यांना ताकद मिळते. पाठ, पोट, वगैरे मानेखालच्या सर्वांगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’सारख्या तेलाने चोळावे . तेल लावल्यावर अर्धा-पाऊण तास व्यवस्थित जिरू द्यावे, नंतर पुसून घ्यावे किंवा स्नान करावे.
तसेच या वयात जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा मीठ लावून चघळणे उपयुक्त असते. किंवा या व्यतिरिक्त आल्याचा रस, लिंबाचा रस आणि मध हे मिश्रणही पचनासाठी उपयुक्त असते. तर जेवण्याआधी याचा सेवन करावा.