पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – प्रत्येक ऋतूत हवामान हे वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये घ्यायचा आहार हा वेगळा असतो. आणि तस केलं तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहते. परंतु पावसाळ्यात आहाराकडे खूप लक्ष द्यावं लागत. पावसाळयात संतुलित आहार घेणं गरजेचं असत. त्यामुळे पावसाळ्यात काय खायला पाहिजे. काय नको हे आहारतज्ञांकडून माहित करून घेतले पाहिजे. कारण आपले आरोग्य व्यवस्थित असेल तरच आपण कोणतीही गोष्ट व्यवस्थितपणे करू शकतो.
पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत ते खालील प्रमाणे
१) खमंग भजी हि पावसाळ्यात खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात. परंतु भजी तळण्यासाठी नेहमी शेंगदाण्याच्या किंवा मोहरीच्या तेलाचा उपयोग करावा.
२) पावसाळ्यात सर्वात उत्तम धान्य म्हणजे नाचणी तुम्ही नाचणीचे पापड, भाकरी किंवा लापशी पण खाऊ शकता.
३) दुधी भोपळा, घोसाळे, कारले, वाल, कारफ्लॉवर, श्रावणघेवडा, गवार, सुरण, माठ अशा भाज्या खाव्यात.
४) पावसाळ्यात जास्त गोड खाऊ नये. आंबट, तिखट ,कडू, तुरट खाल्ले तरी चालेल.
५) वात, पित्त आणि कफ वर्धक खाऊ नये उलट वात, पित्त आणि कफ शामक खावे.
६) पचनाला हलका, शक्तीदायक आहार घ्यावा.
७) मूग, मसूर अशी कडधान्ये पचायला हलकी असतात. त्यामुळे ती जास्त प्रमाणात खावीत चवळी, वाटाणा, पावटे,मटकी अशी धान्ये जास्त खाऊ नयेत .
८) पावसाळ्यात मसाले घालून बनवलेली मूग, मसूर, तूर, चवळी या कडधान्यांची कढणे किंवा पाणी, टॉमेटोचे सार,आमसुलाचे सार किंवा कढी उदा. फुलके, भाजलेला पापड खावेत.