आरोग्यनामा ऑनलाईन टीम- वेळेची बचत करण्यासाठी अनेकदा एकदाच मोठ्याप्रमाणात अन्न शिजवून ते फ्रिजमध्ये ठेवले जाते. आवश्यकता असेल तेव्हा ते काढून खाल्ले जाते. परंतु, असे करणे योग्य नसून उन्हाळ्यात यामुळे त्रास होऊ शकतो. शिळ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढत असल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
चार ते पाच तासांपूर्वी तयार केलेले अन्न खाण्यास हरकत नाही. परंतु याहून अधिक काळ तयार केलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. कापलेली फळे आणि भाज्या तर मुळीच वापरू नयेत. फ्रिजमध्ये ठेवलेले डेअरी प्रॉडक्ट्स देखील अधिक दिवसांपर्यंत वापरू नये. दूध उकळल्यावर ते त्याच दिवशी संपवावे.
शिळे अन्न पोटातील कर्करोगाचा धोका निर्माण करते. यात आढळणाऱ्या बॅक्टेरियामुळे हायड्रोकार्बन आणि कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच उन्हाळ्यात तापमान अधिक असल्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात. एक ते दोन तासांतच किटाणूंची संख्या तिप्पट वाढल्याने फूड पॉयझनिंग आणि लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. शिळे अन्न खाल्ल्याने पोटात गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. फ्रिजमध्ये गार झालेले अन्न खाल्ल्यानेदेखील पोटदुखीचा त्रास होतो. पचनतंत्र आणि प्रतिरक्षातंत्र कमजोर झाल्यामुळे उन्हाळ्यात शिळेअन्न सेवन केल्याने अतिसाराचा त्रास होऊ शकतो. लूज मोशन, उलट्या, तापदेखील येऊ शकतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.