आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतामध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परंतु हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी अजून काही उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक रुग्ण दगावत होते. परंतु संशोधकांनी कर्करोगाच्या पेशी शरीरातच नष्ट करण्याचा उपाय शोधून काढला आहे.
यात कर्करोगाच्या पेशी स्वतःच स्वतःचा नायनाट करणार आहेत. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना एक दिलासा मिळाला आहे. आपल्या शरीरात लाखो सेल्स असतात. आणि त्यातील ज्या सेल्स आपल्या शरीरासाठी घातक असतात. ज्या सेल्स शरीरासाठी घातक आहेत त्या सेल्स आता स्वतःहूनच नष्ट होणार आहेत.
शरीरात कर्करोगाचा ट्युमर वाढत असताना याला कंट्रोल करणं अवघड होत. परंतु, आता कर्करोगाच्या ट्युमरवर कंट्रोल करता येणार आहे. वैज्ञानिकांद्वारे शोधण्यात आलेल्या पाथवे म्हणजे मार्गाला एटीएफ-४ असं नाव देण्यात आलं आहे. ज्यात प्रोटीन आहे. आणि जेव्हा हा मार्ग ब्लॉक केला जातो. तेव्हा कॅन्सरचे सेल्स प्रमाणापेक्षा अधिक प्रोटीनची निर्मिती करू लागतात. आणि स्वत:च मरतात.
वैज्ञानिकांनी सेल्स जिवंत राहू नये हा प्रयोग टार्गेट ओळखण्यासाठी केला. त्यांचा मुख्य उद्देश एटीएफ-४ ला टार्गेट करणे हा होता. दोन्ही सिग्नल येऊन मिळतात. त्यामुळे कर्करोगाला सर्व्हाइव करण्याची संधीच मिळणार नाही. असं संशोधकांनी सांगितलं आहे.