आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानवी मनात विविध प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. मात्र, काही इच्छा ह्या शरीराची गरज असतात. अशा इच्छा पूर्ण केल्या नाही किंवा दाबल्या की याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशाच काही इच्छांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
ढेकर रोखणे
ढेकर रोखल्याने जेवणाची इच्छा राहत नाही. त्यासोबतच डोकेदुखी, छातित दुखणे, उल्टी, उचकी, पोटदुखी अशा समस्या होतात. यामुळे ढेकर रोखू नये.
शिंक रोखणे
शिंकेचा वेग रोखल्याने नेत्र रोग, डोके दुखी, लवका, कानाची समस्या, फुफ्फूसांतील रोग आणि दम्यासारखे अनेक रोग होऊ शकता. यामुळे शिंक कधीच रोखू नका.
तहान रोखणे
तहान लागल्यावर लगेच पाणी प्यावे. तहानेची तीव्रता रोकल्याने तोंड कोरडे पडणे, रक्तदाब कमी होणे, बहीरेपणा, हृदयरोग, चक्कर येणे या सारख्या समस्या होतात.
भुक रोखणे
भूक लागल्यावर लगेच जेवण करावे. भूक रोखल्याने डोके दुखी, पोटात जळजळ, लो ब्लड प्रेशर, बेशुध्द होणे, उलटी आणि अशा अनेक समस्या होऊ शकता. खुप वेळ भुक रोखुन धरल्याने डोळे कमकुवत होतात.
उल्टी रोखणे
उल्टी रोखल्याने शरीरात जळजळ, त्वचेसंबंधीत रोग, पचनक्रियेचे रोग, डोकेदुखी, गुप्तांगाच्या समस्या, खोकला, श्वाससंबंधीत आजार यासारख्या अनेक समस्या होऊ शकतात.
पोटातील गॅस
पोटातील गॅस रोखल्याने पोटदुखी, मुळव्याध, डोकेदुखी, हृदयरोग, मूत्र थांबणे, डोळ्यांचे आजार आणि इतरही अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
मूत्र रोखणे
मूत्र रोखल्याने अनेक समस्या होऊ शकता. उदाहरणार्थ सांधेदुखी, मुतखडा, किडनीचे आजार होतात. यामुळे मूत्र रोखू नये.