पुणे आरोग्यनामा ऑनलाईन – रासायनिक खतांचा भरमसाठ वापर अन् किटकनाशकांची फवारणी, तणनाशकाचा सततचा वापर यामुळे शेती उत्पादनाचेच आरोग्य बिघडत चालले आहे. तेच अन्न खाऊन कॅन्सरसारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे गावोगावी कॅन्सर रोगनिदान शिबीर आयोजित करुन वेळीच तपासणी होवून उपचार घेता येतात. अन् कॅन्सरपासून दूर राहता येते, असे मत सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी व्यक्त केले.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचलित साधन केंद्र मोहोळ, आपुलकी ग्रामसंस्था आणि शिरापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित मोफत कॅन्सर रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात एकूण १६५ महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच सागर राजेपांढरे, उपसरपंच सौदागर साठे, ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर, मुख्याध्यापक बी.जी. कुलकर्णी, सुहास आदमने, शशिकांत धोत्रे आदी. उपस्थित होते. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटलचे अवधुत डांगे, छाया पाटील, भाग्यश्री सुपेकर, सुरेश धम्मे आदींनी रुग्णांची तपासणी केली.
महिला बचतगटाच्या सुजाता राजेपांढरे, वृषाली सावंत, सुनिता गावडे, संगिता राजेपांढरे, अश्विनी काळे, उषा सर्वगोड, दीपाली चव्हाण, महादेवी शितोळे, सुनिता ताकमोगे, मुक्ता देवकते, पुष्पा शेंडगे, शालिनी राजेपांढरे, सुनिता राजेपांढरे, वैजयंता मसलकर, वंदना गोफणे, सविता साठे, चित्रा हंडे, अनुराधा बारगळ, वनमाला चव्हाण, माधुरी चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली. सूत्रसंचालन वृषाली सावंत यांनी केले. सुजाता राजेपांढरे यांनी आभार मानले.