आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये तुळस आढळून येते. हिंदू संस्कृतीमध्ये तुळस पूजनीय रोप मानले जाते. तुळशीचे रोप अंगणात लावल्याने रोग घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि यामुळे हवा शुद्ध होते. तुळशीचे वानस्पतिक नाव ऑसिमम सँक्टम असे आहे. तुळशीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग करतात. आणि महत्वाचे म्हणजे मुतखड्यासारख्या भयंकर आजारावर तुळस ही वरदान आहे.
१) तुळशीचे पाने उकळून काढा तयार करून घ्या. या काढ्यामध्ये मध टाकून नियमित ६ महिने याचे सेवन केल्यास मुतखडा लघवीद्वारे बाहेर पडेल. हा सोपा आणि अचूक उपाय आहे.
२) जर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर आपले शरीर एवढे शुद्ध होते. जेवढे चांद्रायण व्रत केल्यानंतरही होत नाही. तुळशीचा गंध जेवढा दूरपर्यंत जातो तेथील वातावरण आणि त्याठिकाणी निवास करणारे जीव निरोगी आणि पवित्र राहतात.
३) तुळशीच्या पाने चहात टाकून हा चहा नियमित घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
४) पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी गाळून घेऊन जर ते पाणी पिले तर तुमचा मुतखडा लवकर बरा होईल.