आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याला चालणे, फिरणे, दैनंदिन कामे करणे, इत्यादी कामासाठी सांध्यांचे आरोग्य खुप महत्वाचे असते. गुडघेदुखीचा त्रास असल्यास या सर्व कामांवर त्याचा परिणाम होतो. हा त्रास होण्याची विविध कारणे आहेत. दिवसभरात आपण ज्या चुका करतो त्याचा वाईट परिणाम गुडघ्यांवर होतो. यामुळे गुडघेदुखी, पाय आखडणे असा त्रास होतो. काही चुका टाळल्या तर या समस्येवर नियंत्रण मिळवता येते.
ही आहेत कारणे
१) जास्त वजन उचलणे.
२) चुकीच्या पॉश्चरमध्ये बसणे.
३) हाय हिल सँडल घालणे.
४) ओव्हर एक्सरसाइज करणे.
५) लठ्ठपणा.