आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम या प्रकियेत सेवन केलेल्या खाद्यपदार्थांचे आणि पेयांचे ऊर्जेत रूपांतर केले जाते. मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावल्यास शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. ही पातळी म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट (बीएमआर) चांगला ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात.
सकाळचा नाश्ता नियमित करणे शरीरासाठी अवश्य आहे. सकाळी नाष्टा न केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावू शकते. तसेच जास्त काळ उपाशी राहू नये. जर योग्य वेळी नाश्ता आणि जेवण केले तर वजनही संतुलित राहण्यास मदत होते. झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करावे. १२०० पेक्षा कमी कॅलरी घेतल्यावर मेटाबॉलिझम कमी होतो. मेटाबॉलिझम चांगला ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. यासाठी कार्बोहायड्रेट्स घ्यावी आणि मेदयुक्त पदार्थ कमी केले पाहिजेत.
दररोज व्यायाम करावा. दारूचे सेवन करू नये आणि भरपूर पाणी प्यावे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालावे. वजन उचलण्याचा व्यायाम करून स्नायू पिळदार करावेत. शारीरिक हालचाली वाढवाव्यात. हे सर्व उपाय नियमित केल्यास मेटाबॉलिझम चांगला राहिल्याने आरोग्यही अबाधित राहील. धिप्पाड असणारांचे शरीर जास्त कॅलरी जाळते. ज्यांचे स्नायू जास्त असतात त्यांच्याबाबतही असेच होते. समान वयाच्या पुरुष आणि महिलांच्या शरीरातील मेदाच्या प्रमाणातही फरक असतो. पुरुषांमध्ये मेद कमी असतात. त्यामुळे ते जास्त कॅलरी जाळतात. वय वाढण्यासोबतच स्नायूंचे मांस कमी होते. तसेच कॅलरी जळण्याची प्रक्रिया मंदावते.