आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या लहान मुलांना मोबाईलचे खुप वेड लागले आहे. पालकही मुले रडायला लागली की त्यांच्या हातात मनोरंजनासाठी मोबाईल देतात. त्यामुळे त्यांना याची सवय लागते. अभ्यास करण्याच्या वयात मुले इंटरनेट, सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात. ऑनलाईन राहणे, रात्रीचे जागणे, सतत मोबाईल चेक करणे हे मुलांसाठी गंभीर बाब आहे. यामध्येम मुलांना ऑनलाईन छळवणूकीचा अनुभव येतो.
यामुळे मुलांना नीट झोप लागत नाही. नैराश्य येते. असे संशोधकांना आढळून आले आहे. संशोधकाच्या अभ्यासामुळे इंटरनेटवर होणारी सतावणूक आणि नैराश्य यांच्यातील संबधांचा शोध त्यांनी केला. याचबरोबर सायबर छळवणूकीच्या बळी ठरलेल्यांना (सायबर व्हिक्टिमायझेशन) झोप किती लागते. हे जाणून घेऊ पाहणाऱ्या काही मोजक्या अभ्यासांपैकी हा अक अभ्यास ठरला.
संशोधकाच्या अभ्यासामुळे बफेलो विद्यापीठातील संशोधकांनी ८०० किशोरवयीन मुलांची पाहणी केली, यामध्ये मुलांना झोप कशी लागते. त्यांच्यात सायबर आक्रमकता आणि नैराश्य कसे येते, याचा शोध संशोधकांनी घेतला.
बफेलो विद्यापीठातील मिलोल नोन यांनी सांगितले की, इंटरनेटवापसी बनलेल्या संध्याच्या किशोरवयीन मुलांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियावर होणारी सतावणूक किंवा सायबर छळवाद ही प्रमुख समस्या आहे, याचा कार्यकारणभाव समजून घेत असताना, अशा सतावणुकीला बळी पडून नैराश्याची लक्षणे दिसू लागलेल्या मुलांशी संवाद साधण्याची गरज आहे. अशा मुलांना झोपेच्या चांगल्या सवयी लावणे, त्यांची सायबर छळवणूक होणार नाही याची दक्षता घेणे याचीही गरज आहे. असे नोन यांनी सांगितले.
संशोधकाचे म्हणणे आहे की, अनेकदा मुलांमधील नैराश्यमुळे त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. कुटुंबातील व्यक्तीशी त्या दुरावल्या जातात. व त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होते.