आरोग्यनामा ऑनलाईन – मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आजही महिलांमध्ये दिसून येतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजही आपल्याकडे मासिक पाळी याविषयावर मनमोकळी चर्चा होत नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे प्रथम महिला आणि पुरूषांनी जाणून घेतले पाहिजे. दर महिन्यात बीज स्वीकारून गर्भ राहण्यासाठी गर्भाशय तयार होत असते. अशावेळी ते बीज गेले नाही तर त्यासाठी तयार केलेला पडदा नैसर्गिकरीत्या तुटतो आणि मासिक स्त्रावाच्या मार्गाने बाहेर पडतो. यास मासिक पाळी म्हणतात.
जाणून या प्रश्नांची उत्तरे
1 कोणता आहार घ्यावा ?
हिरव्या भाज्या, सॅलड, कोशिंबीर, वरण-भात असा चौरस आहार घ्यावा.
2 मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घ्याव्यात का ?
अतिमहत्वाचे कारण असेल तर चालेल. पण वारंवारता घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मासिक पाळीचे चक्र बिघडण्याचा धोका असतो.
3 काय वापरावे सॅनिटरी नॅपकिन, कापड की मेन्स्ट्रल कप ?
रक्तस्त्राव होत असताना सॅनिटरी नॅपकिन वापरणेच योग्य आहे.
4 पूर्ण आराम करावा का ?
अधिक रक्तस्त्राव, प्रमाणापेक्षा जास्त पोट दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. केवळ आराम करून काहीही होणार नाही.