आरोग्यनामा ऑनलाईन टीम- मेनोपॉज म्हणजे शेवटची पाळी. यात दोन प्रकार असतात. एक प्रीमेनोपॉज आणि एक रजोनिवृत्तिनंतर म्हणजे ४० ते ५० वयोगट असलेला काळ म्हणजे पोस्ट मेनोपॉज होय. मेनोपॉज च्या या दोन्ही स्थितींमुळे महिलांमध्ये मानसिक आणि शारीरिक बदल घडतात. आणि त्यामुळे त्यांना बऱ्याचदा अस्वस्थही वाटते. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे जरुरीचे असते. मग त्यांनी त्यांच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करणे खूपच गरजेचे असते.
* कॅल्शिअम युक्त खाद्य पदार्थ, जसे- डेअरी प्रॉडक्ट, फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या पाले-भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे.
* अधिक मात्रेत साखर आणि मीठ घेतल्याने डायबिटीज व ब्लडप्रेशरची समस्या असू शकते, म्हणून यांचे सेवन कमी मात्रेत करायला पाहिजे.
* कमीत कमी दीड कप फळ आणि दोन कप भाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे.
* हाडांच्या मजबुतीसाठी रोज 20-30 मिनिट सकाळी कोवळ्या ऊन्हात बसायला पाहिजे.
* वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जास्त चरबी युक्त पदार्थ आपल्या डायटमधून काढून टाका.
* झोपण्यापूर्वी दुधात किंवा गरम पाण्यात तूप घालून पिणे. संधिवात, आमवात, गुढघेदुखी, कंबरदुखी यांसारखे त्रास होत नाही.