आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात आंबा आणि पपई या दोन फळांचे खुप महत्व आहे. तसेच आंबा, पपईच्या झाडांची साल, पाने आदी घटकांचेही काही उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी आंब्याची व पपईची पाने मधुमेह आणि डेंग्यूवर रामबाण औषध आहेत. मधुमेह आणि डेंग्यूवर याचा वापर करून कसा उपचार करावा, त्याचा कोणता परिणाम होतो आणि कोणते फायदे होतात याविषयी माहिती घेवूयात.
मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीवर नकारात्मक प्रभाव पडतो. याला संतुलित करण्यासाठी आंब्याची पाने गुणकारी आहेत. आंब्यांच्या पानांमध्ये एन्थोसाइनिडिन नावाचे टॅनिन असते. यात ग्लुकोज शोषून घेण्याचा गुण असल्याने ते रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करते. हा उपाया करण्यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून घ्यावीत. हे पाणी रात्रभर तसेच ठेवून सकाळी गाळून प्यावे.
तर डेंग्यू या गंभीर आजारावर पपईची पाने किती गुणकारी आहेत हे पाहिले तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पपईच्या पानांमध्ये कायमोपापिन आणि पपेनसारखी एंजाइम्स असल्याने पेशी वाढण्यास मदत होते. यामुळे यकृतही चांगले काम करते. डेंग्यूमध्ये पपईच्या पानांचा रसाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. यासाठी पपईची पाने उन्हात वाळवून नंतर स्वच्छ धुऊन पाण्यात उकळून घ्यावीत. नंतर गाळून हे पाणी डेंग्यूच्या रूग्णाला पिण्यास द्यावे.