आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराला योग्यप्रमाणात मॅग्नेशियम न मिळाल्याने मायग्रेन, अस्थमा, ऑस्टोपायरोसिस, उच्च रक्तदाब, टाइप-२ मधुमेह आणि कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. शरीराला दररोज ३५० ग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. शरीराची गरज धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सुक्या मेव्यातून पूर्ण होते. कारण या पदार्थांधमध्ये मॅग्नेशियम असते. बदामात मोठ्याप्रमाणात मॅग्नेशियम असते. तसेच गोड्या पाण्यापेक्षा खारट पाण्यात जास्त मॅग्नेशियम असते. अन्न जास्त प्रमाणात शिजवल्यास मॅग्नेशियम कमी होते.
सोयाबीन, डाळी, फळांत मॅग्नेशियम
मॅग्नेशियमची तपासणी करण्यासाठी सेरम टोटल मॅग्नेशियम ही चाचणी केली जाते. खूपच कमतरता असल्यास इंजेक्शनसुद्धा द्यावे लागते. सोयाबीन, डाळी, फळे, कमी फॅटची दुग्ध उत्पादने यात मॅग्नेशियम असते. गर्भावस्था किंवा मेनोपॉजच्या अवस्थेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅँग्नीज, कॉपर, झिंक, ब-६ आणि ब-१२ जीवनसत्त्वाची शरीराला गरज असते. शाकाहारी महिलांनी ब-१२ जीवनसत्त्वासाठी विशेष औषधे घेतली पाहिजेत.
पचनक्रिया मंदावते
मॅग्नेशियममुळे शरीरात ताकद निर्माण होते. रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. स्नायू आकुंचन पावणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि दात निरोगी ठेवणे यासाठी हे खनिज उपयुक्त असते. मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असल्यास कॅल्शियम आणि पोटॅशियमही कमी होते. अशा स्थितीत सर्वप्रथम पचनक्रिया मंदावते, उलट्या होतात. हृदयविकाराचा धोका असतो. जास्त कॅलरीयुक्त आणि कमी पोषक आहारामुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता होते. १०० ग्रॅम कडधान्य आणि सुक्या मेव्यात ४० ते २०० मिलिग्रॅम मॅग्नेशियम असते.
या पदार्थांचे करू नका सेवन
ज्यांची पचन प्रक्रिया बिघडलेली असते, त्यांना मॅग्नेशियमची कमतरता असते. शौचास वेदना होणे, अल्सर, कोलायटिस हे आजार याच कमतरतेमुळे होतात. जास्त साखर, कॅफिन आणि दारू चे सेवन केल्यानेही मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होते.