आरोग्यनामा ऑनलाईन- अंजीरात(fig) आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिनं, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. अंजीर थंड असलं तरी ते पचण्यास जड असतं. हल्ली अंजीर(fig) वाळवून त्याचा वापर ड्रायफूट म्हणूनही केला जातो. परंतु सुक्या अंजीरापेक्षा ताजे अंजीर खाणं जास्त पौष्टीक असतं. याचा शरीराला जास्त फायदा होतो. कारण यातून शरीराला जास्त प्रमाणात पोषक घटक मिळतात. सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळतात.
अंजीर खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) यात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. त्यामुळं पोट साफ होण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
2) अंजीरामुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
3) शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीकरणासाठी पिकलेले अंजीर खावेत. कारण अंजीर थोडे थंड असतात.
4) जागरण, रात्रपाळी, चहा आणि धूम्रपानाचं जास्त सेवन यामुळं शरीराचं नुकसान होतं. रोज ताजे अंजीर खाल्ले तर शरीराचं हे नुकसान भरून निघतं.
5) पायांना भेगा पडल्या तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.
6) आजारपणामुळं अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीराचं सेवन करावं. आठवड्याभरातच अशक्तपणा कमी होतो आणि शरीराला शक्ती मिळते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.