आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दैनंदिन जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आपणाला जगायचे असेल तर किमान तीन मूलभूत गरजा-हवा ,पाणी व अन्न आवश्यक असते. एक वेळ अन्न नसले तरी चालते पण तुम्हा-आम्हाला प्यायला पाणी हवेच. अन्नाशिवाय मनुष्य ३ आठवडे जगू शकतो पण पाण्याशिवाय केवळ ३-४ दिवसच जगू शकतो.
जपानी लोक दिर्घ आयुषी असतात हे विज्ञानानी सिद्ध केलं आहे. त्यांच्या आहारामध्ये गरम पाणी पिण्याला खूप महत्व आहे. सकाळी उठल्याबरोबर भरपूर गरम पाणी पिण्याची प्रथा कैक शतकांपासून चालत आली आहे. रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन करण्याचे महत्व आहारतज्ञही सांगतात.
आता आपण जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे फायदे ;
१) गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे बद्धकोष्ठ व गॅसची समस्या दूर होते. आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले.
२) तुम्हाला जर सर्दीचा वारंवार त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी प्यायल्याने गळाही साफ आणि चांगला राहतो. खोकला व कफ असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.
३) महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा साध्या किंवा गार पाण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोटदुखी वर आराम मिळतो.
४) गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते ज्यामुळे घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्ध गोष्टी (टॉक्सिन्स) बाहेर पडण्यास मदत होते.
५) गरम पाण्यामुळे त्वचा सतेज व निरोगी राहते. वाढते वय लवकर लक्षात येत नाही. रिंकल्स आणि पिंपल्सची समस्या दूर होते.
६) गरम पाण्यामुळे केस चांगले राहतात. कोंड्याची समस्या नाहीशी होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्या वाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.
७) गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीचे आजार दूर राहतात. मुतखडाची समस्या कमी होण्यात मदत होते.
Dr.Gayatri Sameer Bodas
B.H.M.S.,Certified Nutritionist
Dnyanada Clinic
Shop no.8,Kumar Pushkar
840 Sadashiv Peth,Pune-30
Mob.-8983781407