आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चपाती, भाकरीला आपल्या जीवनात खुप महत्व आहे. कारण भूक शांत करण्यासाठी चपाती शरीरासाठी आवश्यक आहे. काही लोक चपाती विविध गोष्टींसोबत खातात. परंतु, काही पदार्थ असे आहेत ज्यांचासोबत चपाती खाणे अयोग्य आहे. कारण यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चपाती कोणत्या पदार्थासोबत खाऊ नये, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
चपाती आणि भात
१. चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने शरीरात कॅलरी वाढतात.
२. अस्वस्थता वाढते.
३. झोप कमी येते.
४. तुम्हाला हा त्रास होत असल्यास या दोन गोष्टी एकत्र खाणे बंद करा.
आजारी व्यक्तीने भात खाऊ नये
रात्री भात खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. कारण, रात्री आपण कोणतेही कष्टाचे काम करत नाही. रात्री भात खाणे टाळले पाहिजे. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांनी रात्री चुकूनही भात खाऊ नये. तसेच आजारी व्यक्तीने भात बिलकुल खाऊ नये. तांदुळ थंड असल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.