आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सर्पदंशाचे प्रमाण आजही ग्रामीण भागात मोठे आहे. भारतात दरवर्षी सर्पदंशाने लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. त्यातच मोठ्याप्रमाणात जंगलतोड होत असल्याने जंगलातील प्राणी हे माणसांच्या वस्तीमध्ये शिरकाव करू लागले आहेत. त्यामुळे विविध जातीचे साप काहीवेळा शहरातही आढळतात. सापाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. परंतु, सर्वच साप विषारी नसतात. सापाबाबत प्रत्येकाच्या मनात असलेली प्रचंड भिती हेच सर्पदंशाने मृत्यू होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. तसेच अन्य कारणे सुद्धा आहेत. साप आपल्याला दंश का करतो? याचीही विविध कारणे असून याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
विषारी सापाच्या विषाच्या एका थेंबानेही माणूस मृत्युमुखी पडू शकतो. विष शरीरात भिनल्यानंतर, उपचार वेळेवर न झाल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडतात. साप चावल्यांनतर सुरूवातीला हात-पाय थरथरायला लागतात. कानाला त्रास होतो. ऐकू येत नाही. झपाट्याने शरीरात वीष पसरते. आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. साप माणसाला दंश का करतो याविषयी आजही अनेकांना माहिती नसते. सापाची भिती प्रत्येकाला वाटते. सापाला छेडणे म्हणजे मृत्युला कवटाळण्यासारखे आहे.
या कारणांमुळे चावतो साप
* जर एखादा व्यक्ती सापाच्या पिलांना त्रास देत असेल तर त्यांच्या रक्षणासाठी चाप दंश करतो.
* साप हा भित्रा प्राणी असला तरी बचाव करण्यासाठी तो चावा घेतो. नाग- नागिनीच्या प्रणय प्रसंगाच्यावेळी जर कोणी व्यत्यय आणला तर साप त्यांना छेडणारांना दंश करू शकतो. हा प्रणय सुरू असताना नेहमी दूर उभे रहावे.
* साप पिसाळला तर कारण नसताना दंश करू शकतो.
* साप भुकेलेला असेल तर कारण नसताना कुणालाही दंश करू शकतो.
* एखाद्या व्यक्तीचा मृत्यु सर्पदंशामुळे होणार असेल तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही, असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे.
* सापावर चुकुन पाय पडला तर तो दंश करतो.
* सापाला विनाकारण छेडले किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर साप चावा घेऊ शकतो.
सर्पदंशावरील उपाय
* सापाने डंक केला तर त्या जागेच्यावर रूमाल किंवा कापडाने घट्ट आवळून घ्या. असे केल्यांनतर सापाचे विष झपाट्याने शरीरात जात नाही.
* नंतर तात्काळ आरोग्य केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन उपचार करा.
* साप चावला असेल तर घाबरू नका.
* घाबरल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते.