आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. भिजवलेल्या बदामात व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर असते. यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते तसेच आरोग्य निरोगी राहते.
हे आहेत आरोग्यदायी फायदे
१) बदामातील अॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे कोलेस्टेरॉल कमी होतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होतो. हृदयविकारांपासूनही बचाव होतो.
२) गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाल्ले तर गर्भाच्या वाढ चांगली होते. गरोदर स्त्रियांना याचा लाभ होतो.
३) रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम उपयोगी आहे. यातील अल्फा टेकोफेरॉल्स रक्तदाब नियंत्रित राहतो.
४) कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. बदामाच्या सालींमध्ये एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)